नगरपालिकेच्या हलगर्जीपणामुळे सामाजिक सभागृह अंधारात:- लाईट बिल थकल्याने वीजपुरवठा खंडित.
शहरातील विविध सामाजिक सभागृहांचे थकित वीजबिल न भरल्यामुळे वीज वितरण कंपनीने वीजपुरवठा खंडित केल्याची घटना समोर आली आहे. नगरपालिकेकडून दीर्घकाळ वीजबिलाची थकबाकी न भरल्याने अखेर वीज कंपनीने ही कारवाई केली असल्याचे सांगितले जात आहे.
सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक कार्यक्रमांसाठी वापरल्या जाणाऱ्या या सभागृहांमध्ये अचानक अंधार पसरल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. अनेक कार्यक्रम रद्द करावे लागले, तर काही कार्यक्रम अडचणीत पार पडले. स्थानिक नागरिकांनी याबाबत नगरपालिकेच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, सार्वजनिक उपयोगाच्या सभागृहांचे वीजबिल वेळेत भरणे ही नगरपालिकेची जबाबदारी आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.
दरम्यान, नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी थकीत वीजबिल लवकरात लवकर भरून वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच भविष्यात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी योग्य ती उपाययोजना केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.


