फलटण तालुक्यामध्ये “अनुसूचित जाती जमाती” प्रवर्गातील काही विशिष्ट” जाती “असुरक्षित……

फलटण – दि.
फलटण तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील काही विशिष्ट जातीच असुरक्षित असल्याचे चित्र दिसून येत आहे या जातीतल्या लोकांची अशी अवस्था झाली आहे की “कोणीही यावं आणि टपली मारून जावे ” या म्हणी सारखे यांच्यावर अन्याय करण्यास कुठलाही धन दांडगा राजकीय वरदहस्त डोक्यावर असणारा मस्तवाल आक्का कुठलाही अन्याय करताना घाबरत नाही कारण की जणू काय त्याची याच कामासाठी नेमणूक केली आहे व त्याचा जन्म ही अन्याय करण्यासाठीच झालेला आहे असे चित्र फलटण तालुक्यात दिसून येत आहे त्यांना कुठल्याही कायद्याचा धाक राहिलेला दिसून येत नाही त्याना असे वाटते की आम्ही पैशाच्या जोरावरती सगळी प्रशासकीय व्यवस्था विकत घेऊ शकतो. अनुसूचित जाती या प्रवर्गातील घटक महसूल प्रशासन,सहकार प्रशासन, किंवा पोलीस प्रशासन,असो या प्रवर्गातील जातीला या कुठल्याही प्रशासकीय व्यवस्थ मध्ये न्याय मिळताना दिसत नाही. त्याचेच एक उदाहरण पोलीस स्टेशनला एखाद्या धनदंड्याच्या विरोधात तक्रार देण्यासाठी गेले असता फलटण शहर पोलीस स्टेशन असो किंवा ग्रामीण पोलीस स्टेशन असो त्यांची तक्रार या धन दांडग्याच्या विरोधात नोंदवून घेतली जात नाही. उलट तक्रार देण्यास जाणाऱ्या वरतीच गुन्हे दाखल केले जातात. म्हणून जर का भीतीने व न्याय मिळण्याच्या दृष्टीने या प्रवर्गातील लोकांनी सातारा येथे एस पी साहेबांना व फलटण येथे डी वाय एस पी,साहेबांच्या ऑफिस कडे तक्रारी अर्ज तक्रार नोंदवून घेण्यासाठी केला असता तो अर्ज फलटण शहर पोलीस स्टेशनमध्ये चौकशीसाठी खाली येतो परंतु वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आलेल्या चौकशीसाठीच्या पत्राला पोलीस स्टेशनमध्ये कुठलंही महत्व न देता त्या पत्राला दाखवले जाते कचऱ्याची टोपली. तक्रारदाराला बोलावून त्याच्या तक्रारी संबंधित कसलीही चौकशी केली जात नाही ना त्या तक्रारारीच्या अनुषंगाने ज्याच्या वरती तक्रारी अर्ज आलाय त्याची कसलीही चौकशी कित्येक दिवस व महिने केली जात नाही ना गुन्हा नोंदवून घेतला जातो त्यामुळे फलटण तालुक्यामध्ये लोकशाही अस्तित्व आहे की नाही असे प्रश्नचिन्ह अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांच्या मनात निर्माण झाले आहे. हजारो वर्षे गाव कुसाबाहेर राहून अन्याय सहन करणाऱ्या लोकांना आजही लोकशाही असणाऱ्या देशामध्ये प्रस्थापित लोकांकडून व प्रशासकीय अधिकाऱ्या कडून त्यांनी केलेला अन्याय सहन करावा लागत आहे शासनात बसलेले प्रतिनिधी व प्रशासकीय अधिकारी यांचे हात मिळवणी करून हे या अन्यायकर्त्या व्यक्तींच्याच पाठीशी उभे राहून त्यांना पाठबळ देताना दिसून येत आहे अनुसूचित जाती जमातीतल्या लोकांच्या संपत्ती संदर्भातील बनावट कागदपत्रे तयार करून जमिनी लुटल्या जातात याच्याकडेही कुठल्याही महसूल प्रशासकीय अधिकाऱ्याचे व पोलीस प्रशासनाचे कसलेही लक्ष नाही उलट तेच प्रशासकीय अधिकारी व पोलीस प्रशासन त्यांना प्रोटेक्शन देऊन त्यांच्या संपत्ती लुटण्यासाठीची परवानगी देत असल्याचे चित्र स्पष्ट दिसून येत आहे .
आता नुकत्याच काही दिवसांपूर्वी झालेल्या आमदार, प्रांताधिकारी,तहसीलदार व पोलीस प्रशासनातील अधिकारी व सामाजिक कार्यकर्ते यांची अनुसूचित जातीत जमाती या प्रवर्गातील घटकांवरती होणारे अन्याय व समस्या सोडवल्या जाण्यासाठी शासनाने गठीत केलेली दक्षता कमिटीची स्थापना झालेली आहे. ही कमिटी फलटण तालुक्यातील व फलटण शहरातील पीडित अन्यायग्रस्त लोकांना न्याय मिळवून देईल काय ? दक्षता समिती वरती स्वतःला लोकसेवक म्हणविणारे लोकांच्या समस्या सोडू शकतील काय ? होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडू शकतील काय की पुन्हा एकदा येरे माझ्या मागल्या असाच प्रकार घडणार आहे का ? की नुसतेच दक्षता समितीचे सदस्य म्हणून मिरवणार
का ? धन धांडग्यांच्या व राजकीय पुढार्यांच्या आडोशाला जाऊन त्यांच्या ओझ्याखाली दबून जाणार अन्यायग्रस्त आज प्रतीक्षेत आहेत न्यायाच्या जर एखाद्या वरती एखादा धन दांडगा अन्याय करत असेल तर त्या धन दांडग्याच्या विरोधात उभे राहण्याची हिंमत ठेवतील काय व त्याने केलेल्या अन्यायाच्या विरोधात लढा उभारू शकतील काय आज अनुसूचित जाती जमातीच्या पीडित लोकांवरती राजकीय वरदहस्त असणाऱ्या धन दांडग्यांची एवढी दहशत आहे की त्यांच्या डोक्यावरती असणाऱ्या राजकीय वरद हस्तांमुळे व त्यांच्याकडे असणाऱ्या धनसंपत्तीमुळे काळा बाजार करून मिळवलेल्या संपत्तीतून ते या अनुसूचित जाती जमातीतील लोकांच्या वरती कुठलाही कसलाही अन्याय करायला ते मागेपुढे बघत नाहीत त्यांना तेवढे पाट बळ मिळत असते आज अनुसूचित जाती जमातीचे कैवारी म्हणून हे जे समाजसेवक प्रशासकीय अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांच्या समोर लोकांच्या वर होणारे अन्यायाच्या विरुद्ध आम्ही लढा उभारू असे म्हणणारे वेळ आल्यानंतर एखाद्या धंनदांडग्याच्या विरोधात अन्यायग्रस्ताच्या बाजूने उभे राहतील काय फलटण तालुक्यातील अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील जनता ठाऊक फोडत आहे फलटण शहर पोलीस तसेच फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये अनुसूचित जाती जमाती प्रवर्गातील लोकांना किडा मुंग्यासारखी वागणूक दिली जाते कुणावर कितीही अन्याय झाला तरी त्यांच्यावर अन्याय करणाऱ्या अन्यायकर्त्यावरती कसलीही तक्रार नोंदवून घेतली जात नाही ही मोठी शोकांतिका आहे
फलटण तालुक्यामधील आता थोड्याच दिवसांपूर्वी अनुसूचित जाती जमाती प्रवर्गाची दक्षता कमिटी तयार झाली त्यामध्ये आमदार साहेब व सामाजिक कार्यकर्ते यांची नावे घेतली गेलेली आहेत हे दक्षता कमिटीतील सदस्य अनुसूचित जाती व जमातीवरती होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात पोलीस स्टेशनला जाऊन जाब विचारणार का ?
सविस्तर बातमीसाठी वाचा सा. लोकध्यासचा पुढील आठवड्यातील अंक…….
पुढील बातमी – !! 2017 मधील सावकारकिच्या प्रकरणा बाबत !!