आईच्या संस्कारातून घडलेली ही लेखणी परिवर्तनाची वाट उजळत आहे. : प्रा विकास शिंदे……



फलटण : 16 मार्च 2026

           समाजातील वंचित, उपेक्षित घटकांसाठी आयुष्य समर्पित करणाऱ्या आणि शिक्षणाच्या माध्यमातून परिवर्तन घडविणाऱ्या व्यक्तींमध्ये सौ. सुलेखा सुरेश शिंदे यांचे नाव आदराने घेतले जाते. महात्मा फुले यांच्या विचारांची प्रेरणा घेऊन त्यांनी शिक्षण, सामाजिक कार्य आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांत महत्त्वपूर्ण कार्य केले आहे.


सौ. सुलेखा शिंदे यांचा जन्म महात्मा फुले यांच्या खानवडी या गावात फुले कुटुंबात झाला. लहानपणापासूनच त्यांना सामाजिक कार्याची प्रेरणा मिळाली. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरू केलेल्या शिक्षण चळवळीचा वारसा त्यांनी आपल्या कामातून पुढे नेला.
ऊसतोडणी मजुरांच्या मुलांना शिक्षण मिळावे या उद्देशाने सुरू झालेल्या साखरशाळेत त्या पहिल्या शिक्षिका म्हणून कार्यरत राहिल्या. ऊसतोडणीसाठी स्थलांतर करणाऱ्या मजुरांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, म्हणून त्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही शिक्षणाचा दिवा तेवत ठेवला.
त्यांनी केवळ साखरशाळेतच नाही तर प्रौढ शिक्षण केंद्र चालवून मोठ्या वयाच्या निरक्षर व्यक्तींनाही शिक्षणाची संधी दिली. समाजातील प्रत्येक व्यक्ती साक्षर व्हावी या ध्येयाने त्यांनी रात्रशाळा आणि बिनभिंतीची शाळा असे अभिनव उपक्रम राबवले. या उपक्रमांमुळे अनेकांना शिक्षणाची दारे खुली झाली.
सामाजिक कार्यासोबतच त्यांनी साहित्य क्षेत्रातही आपली वेगळी ओळख निर्माण केली. घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना त्यांनी लेखनाची परंपरा कायम ठेवली. त्यांच्या साहित्यकृतींमध्ये ग्रामीण जीवन, स्त्रियांचे प्रश्न, सामाजिक वास्तव आणि संघर्ष यांचे प्रभावी चित्रण दिसून येते.
त्यांच्या “लेखकाचं घर पेलताना” या कादंबरीत कुटुंब आणि साहित्यिक जीवन यामधील संघर्ष आणि जिद्द यांचे वास्तव दर्शन घडते. “कुंकू” या कथासंग्रहातून स्त्रीजीवनातील विविध पैलू अत्यंत संवेदनशीलतेने मांडले आहेत. तसेच “मालकांचं खात” आणि “आता उजाडलं” या कादंबऱ्यांमधून समाजातील विषमता, शोषण आणि बदलाची आस यांचे प्रभावी चित्रण केले आहे.
सौ. सुलेखा सुरेश शिंदे या केवळ शिक्षिका किंवा लेखिका नाहीत, तर त्या समाजपरिवर्तनाच्या चळवळीतील एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वारसा त्यांनी आपल्या कार्यातून जपला आहे.
त्यांच्या कार्यामुळे अनेक मुलांना शिक्षणाचा मार्ग सापडला आणि समाजाला एक संवेदनशील लेखिका लाभली. शिक्षण, सामाजिक जाणीव आणि साहित्य या तिन्ही क्षेत्रांत त्यांनी केलेले योगदान निश्चितच पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल.


आईचा साहित्यिक व सामाजिक वारसा पुढे घेऊन जातोय

                          सौ. सुलेखा शिंदे म्हणजेच माझी आई
समाजपरिवर्तनासाठी आयुष्य झोकून देणाऱ्या व्यक्तींचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचला तरच त्या कार्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होतो. साखरशाळेची पहिली शिक्षिका, सामाजिक कार्यकर्ती आणि साहित्यिका सौ. सुलेखा शिंदे म्हणजेच माझी आई तिचा हा प्रेरणादायी वारसा एक पत्रकार म्हणून मी पुढे घेऊन जात आहे. आई आणि माझ्या नात्यातून जपलेली ही सामाजिक व साहित्यिक परंपरा समाजासाठी प्रेरणादायी ठरेल असे मला वाटते.आईने आयुष्यभर शिक्षण आणि समाजजागृतीसाठी काम केले. ऊसतोडणी मजुरांच्या मुलांसाठी सुरू झालेल्या साखरशाळेत ती पहिली शिक्षिका म्हणून ती काम करत होती साखरशाळेचा जन्म ही तिचीच कल्पना होती अनेक मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले. प्रौढ शिक्षण केंद्र, रात्रशाळा आणि बिनभिंतीची शाळा यांसारखे उपक्रम राबवून त्यांनी वंचित घटकांसाठी शिक्षणाची दारे खुली केली.
सामाजिक कार्यासोबतच तिने साहित्य क्षेत्रातही महत्त्वपूर्ण योगदान दिले. ग्रामीण जीवन, स्त्रियांचे प्रश्न, समाजातील विषमता आणि संघर्ष यांचे चित्रण त्यांच्या लेखनातून दिसून येते. त्यामुळे त्यांचे साहित्य हे केवळ कलात्मक नसून सामाजिक जाणिवांचे प्रतिबिंब ठरते.
या सर्व कार्याचा खोल प्रभाव माझ्यावर पडला., “माझ्या घडण्यात आईचा मोठा वाटा आहे. तिच्या सामाजिक कार्यातून आणि लेखनातून मला समाजाकडे पाहण्याची वेगळी दृष्टी मिळाली. स्त्री-पुरुष समानतेचा विचार, वंचितांच्या शिक्षणासाठीची तिची धडपड आणि समाजातील अन्यायाविरुद्ध आवाज उठवण्याची जिद्द हा माझ्यासाठी मिळालेला वारसा आहे.”
आज पत्रकार म्हणून मी समाजातील विविध प्रश्न मांडत आहे. ग्रामीण भागातील समस्या, वंचितांचे प्रश्न आणि सामाजिक अन्याय यांना मी आपल्या लेखणीतून आवाज देत आहे. माझ्या पत्रकारितेत आईने दिलेली संवेदनशीलता, सामाजिक जाणीव आणि परिवर्तनाची प्रेरणा स्पष्टपणे दिसून येते.
आईकडून मिळालेला हा सामाजिक आणि साहित्यिक वारसा जपणे हीच माझी जबाबदारी आहे. त्यामुळेच मी आईने दिलेल्या विचारांना आणि मूल्यांना पुढे नेत समाजासाठी लेखणी चालवत आहे


सौ. सुलेखा शिंदे यांचे कार्य आणि त्यांचा वारसा पुढे नेण्यासाठी मी प्रयत्न करत आहे समाजासाठी प्रेरणादायी उदाहरण ठरेल. आईच्या संस्कारातून घडलेली ही लेखणी आज समाजातील प्रश्न मांडत परिवर्तनाची वाट उजळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!